व्हिडिओ

Rajkot Fort | Sanjay Raut | राजकोट राड्यावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Published by : Dhanshree Shintre

राजकोट राड्यावरून संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. कोकणची संस्कृती मातीमोल होत आहे असे राऊत म्हणाले. तर पोलिसांच्या वर्दीचाही मान ठेवला जात नाही. सिंधुदुर्गकरांना आता लोकसभेतील चूक लक्षात आली असेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे आणि नाव न घेता राणे कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी आज राजकोट किल्ल्यावर भेट दिली होती आणि त्यानंतर त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

मी आपल्या जिल्ह्याची परिस्थिती जी आहे जनतेला आता कळलं असेल की त्यांनी लोकसभा निवडणूकीत काय चूक केली. त्यांचं स्वातंत्र्य, त्यांनी प्रतिष्ठा, त्यांचा मोकळेपणा जगण्याचा सगळं गमावून बसलो आहे आणि या कोकणची संस्कृती पुन्हा एकदा मातीमोल होताना मला दिसतंय. असं आहे का नावं कशाला घ्यायची, नावं घ्यायची काही गरज नाहीये. ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाची संस्कृती असेल तर मला असं वाटतं की गृहमंत्र्यांनी सांगावं की हो ही माझी संस्कृती आहे असं संजय राऊत म्हणाले.

कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरण; 41 दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे

Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना

वडीगोद्रीतून अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता केला खुला

Akola : अकोला कृषी विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश