व्हिडिओ

Kandivali : कांदिवली समतानगरमधील पाणीटंचाईने त्रस्त रहिवाशांनी दरेकरांशी चर्चा करण्यास दिला नकार

Published by : Dhanshree Shintre

कांदिवलीच्या समतानगरात पाण्यासाठी रहिवाशांचं आंदोलन सुरु आहे. 25 मार्चपासून रहिवाशांना 15 मिनिटे पाणी येत असल्याचा आरोप केला जात आहे. वारंवार सांगूनही पाणी दिलं जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. म्हाडा इमारतीच्या पुर्नविकास झालेल्या इमारतीला कमी पाणी देत असल्याचा आरोप केला जात आहे.

भाजप नेते प्रवीण दरेकरांकडून रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र रहिवाशांकडून दरेकरांचं काहीही ऐकून घेण्यास नकार आला आहे. लोकं ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नसल्याने दरेकरांना परत फिरावं लागलं. म्हाडा इमारतीचा पुनर्विकास करून सरोवा कॉम्प्लेक्स बांधण्यात आला. समता नगरच्या 32 मजली सरोवा इमारत कॉम्पल्समध्ये 2000 कुटुंबे राहतात. आजूबाजूच्या बांधलेल्या नवीन इमारतीत बिल्डर 24 तास पाणी देत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

MVA Press Conference: निवडणूक आयोग भाजपची बी टीम, संजय राऊतांचा निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टावर गंभीर आरोप

दम असेल तर...; महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमधून नाना पटोलेंनी दिलं महायुतीला आव्हान

भारताची वाढती लोकसंख्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हान

Israel - Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम? हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार

Chandrashekhar Bawankule : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक भाजप लढणार का?; चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरळ सांगितले...