व्हिडिओ

Ravi Rana : 'बच्चू कडू महायुतीत कटप्पाच्या भूमीकेत'; रवी राणा यांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल

Published by : Team Lokshahi

बच्चू कडू महायुतीत कटप्पाच्या भूमीकेत महायुतीत राहून पाठीत खंजीर खुपसतीत रवी राणा यांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल. बच्चू कडूं मोर्चात पैसे देऊन माणसं बोलवतात असं देखील रवी राणा म्हणाले आहेत. बच्चू कडूं मंत्री असताना अपंगांसाठी एक ही चांगले काम केलेलं नाही. आंनदराव आडसूळांना राज्यपाल नाही तर राष्ट्रपती केलं पाहिजे असं रवी राणांनी म्हटलं आहे. आंनदराव आडसूळांनी मुंबई सिटी बॅंक घोटाळ्यात अनेकांचे पैसे बुडवले असं ही रवी राणांनी म्हटलं आहे.

याचपार्श्वभूमीवर रवी राणां म्हणाले, शरद पवार अमरावतीला आल्यावर त्यांच्या घरी गेले होते आणि शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत. प्रत्येक व्यक्ती नेत्याकडे जातो भेटतो मला असं वाटतं की, मोर्चा काढणे आंदोलन करणे, मागण्या ठेवणे तुम्ही 33 महिने सरकारमध्ये मंत्री होते, 12 तुमच्याकडे खाते होती त्या खात्यामधलं एखादं काम सांगा कामगारांसाठी, जलसंदर्भातल, शिक्षणाचं, बेरोजगारांचं, शेतकऱ्यांच, शेतमजूरांच कोणत असं काम केलं. आज अपंग कल्याण मंत्री आहे तुम्ही त्या खात्यामध्ये चांगल्याप्रकारे लोकांना मदत केली पाहिजे, अपंगाना न्याय दिला पाहिजे.

म्हणजे माझं म्हणनं आहे इलेक्शन आल्यानंतर कोणते तरी मुद्दे घेऊन बाहेर निघणे त्या मुद्द्यातून लोकांची दिशा भूल करणे. आज एकनाथ शिंदेंनी वैयक्तिकरित्या त्यांना किती लाभ दिला हे बच्चू कडूंनाही माहित आहे. त्याच मुख्यमंत्र्यांना तुम्ही म्हणता समुद्रात बुडवून टाकू, हे सगळ करण्यापेक्षा सरकारमध्ये बसून सरकारसोबत चर्चा केली पाहिजे आणि प्रत्येक प्रश्न सोडवले पाहिजे.

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र; पत्रात काय?

कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरण; 41 दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे

Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना

वडीगोद्रीतून अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता केला खुला

Akola : अकोला कृषी विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन