पंतप्रधान मोदींच्या शिवरायांच्या माफीवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल पाहायला मिळत आहे. शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार आरएसएसचा माणूस आहे असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. आरएसएसच्या माणसाला कंत्राट देऊन चुकी झाल्याची मोदींच्या माफीतून कबूल करण्यात आलं असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे. पुतळा बनवणारा आरएसएसचा माणूस असल्याने मोदींनी माफी मागितली अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे.