मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. अंतरवाली सराटीत जरांगेंचा पाचव्यांदा उपोषण आहे. किती हरकती आल्यात त्याच्याशी देणंघेणं नाही, लाडकी बहीण, लाडका भाऊ हे सरकारचे डाव आहेत. नादी लावून सरकार आरक्षणाच्या मागणीपासून हटवू शकत नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
राज्यात 22 जुलैपासून ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोष यात्रा निघणार आहे. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंच्या नेतृत्वात ही यात्रा निघणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आज समन्वयकांची बैठक पार पडली आहे. बैठकीतून यात्रेचं स्वरुप ठरवण्यात आलं आहे.