तुम्ही 400 पार बोलताय पण आता 400 पार कशी होते हेच बघतो असा उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल आहे. भाजपावरील किती जणांवर ईडी कारवाई केली, रायगडच्या वाऱ्याने अनेक सरकार उलथवून टाकली आहे. ईडीच्या भीतीने अनेक लोक इकडून तिकडे पळत आहेत असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यांवर दीपक केसरकर यांनी देखील पलटवार केला आहे. ज्यांना चारशे च्या पार जायच आहे त्यांना मेहनत घ्यावी लागते. ज्या लोकांना मेहनत करायची नसते ती चारेश चे स्वप्न सुद्धा पाहत नाही. ज्या लोकांना मेहनत करायची नसते ती चारेश चे स्वप्न सुद्धा पाहत नाही. आम्ही उद्धव ठाकरेंबाबात कायम चांगले बोलतो. मात्र त्यांची लोक कुठल्या स्तरावरुन बोलता हे आपण पाहीले आहेत , त्यांना त्यांनी थांबवले पाहीजे असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.