राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पावसाचे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्यापासून किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरामध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईलासुद्धा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईतील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.