जेलमध्ये गेलो तरी भाजपची एकही जागा येऊ देऊ नका असं आवाहन मराठ्यांना मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तर फडणवीसांना राजकारणातून कायमचं संपवा असं सुद्धा जरांगे पाटील म्हणाले. जात संपवायला निघालेल्या पक्षासोबत राहू नका असंही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे.
तर काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं होतं. महायुतील जे पक्ष आहेत त्यांना फटका बसला होता आता येत्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि त्याच्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला हे आवाहन केल्याचं पाहायला मिळत आहे.