मराठा क्रांती मोर्च्याचा उपोषणाचा मुंबईमधील उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलं जातंय. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मराठा क्रांती मोर्च्याचा उपोषण सुरु आहे. तर फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते आहे. जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर जो लाठीचार्ज हल्ला झाला होता त्याच्यातील काही आंदोलक जखमी झाले होते, काही मुलं जखमी झाले होते, महिला आंदोलक सुद्धा जखमी झाले होते आणि त्याचाच निषेध म्हणून आझाद मैदानामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून उपोषण केलं जातंय.