अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, बावनकुळे हवेत उडत होते अजून जमिनीवर आलेच नाही का ते अजून? आता तरी जमिनीवर यायला पाहिजे ना. माझी बावनकुळे साहेबांना विनंती आहे हवेत उडत होता आत तरी जमिनीवर या.
यासोबतच ते म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहिलेच पाहिजे, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री राहिलेच पाहिजे. त्याचाच फायदा आम्हाला होणार आहे. असे अनिल देशमुख म्हणाले.