क्रीडा

टी-20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडिया दिल्ली एअरपोर्टवर दाखल; टीमचं जल्लोषात स्वागत

Published by : Siddhi Naringrekar

बार्बाडोस येथे झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने विजेतेपद पटकावले. त्यावेळी एकच जल्लोष करण्यात आला. त्यानंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते म्हणजे टीम इंडिया भारतात कधी येणार? वादळी वारे आणि पावसामुळे टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली होती.

बार्बाडोसमधून काल टीम इंडियासाठी विशेष विमान पाठवण्यात आले होते. गुरुवारी आज सकाळी 7 वाजता टीम इंडिया दिल्ली विमानतळावर दाखल झाली आणि एकच जल्लोष झाला. चाहत्यांकडून टीम इंडियाचे दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली.

आज सकाळी 11 वाजता टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवरही टीम इंडिया जाणार आहे. मुंबईत टीम इंडियाची विजयी यात्रा काढली जाणार असून 3 वाजता टीम इंडिया मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोल्हापुरात राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचं आंदोलन

Rohini Khadse : मला माझं तिकीट कन्फर्म आहे एवढे माहित आहे; मला पक्षाने आदेश दिलेलं आहेत, तुम्ही कामाला लागा

अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक प्रकरण; आरोपींवर एफआयआर दाखल

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी अत्याचाराची घटना; पाच वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार

ललित पाटील ड्रग्स प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू