क्रीडा

IND vs ENG 1st TEST | सामन्यावर पावसाचे सावट;भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज

Published by : Lokshahi News

नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा आज पाचवा दिवस आहे. आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. दरम्यान भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज आहे. पावसामुळे खेळपट्टीवर विकेट घेण्याचा फायदा इंग्लंडला असणार आहे. त्यामुळे भारताला विजय मिळवता येतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भारत आणि इंग्लंड या संघात नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतचा आज पाचवा दिवस आहे. मात्र पाऊस पडत असल्यामुळे सामना सुरू होण्यास विलंब झाला आहे. चौथ्या दिवसअखेर भारताने १ बाद ५२ धावा केल्या असून त्यांना विजयासाठी अजून १५७ धावांची गरज आहे. पहिल्या डावात दमदार खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला स्टुअर्ट ब्रॉडने तंबूचा मार्ग दाखवत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चौथ्या दिवसअखेर सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी १२ धावांवर नाबाद आहेत.

Diwali 2024: फराळासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामध्ये असू शकते भेसळ! अशाप्रकारे ओळखा भेसळ...

MVA Press Conference: निवडणूक आयोग भाजपची बी टीम, संजय राऊतांचा निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टावर गंभीर आरोप

दम असेल तर...; महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमधून नाना पटोलेंनी दिलं महायुतीला आव्हान

भारताची वाढती लोकसंख्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हान

Israel - Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम? हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार