विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच अनेक बैठका, दौरे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात आज आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता असून लवकरच निवडणुकांच्या तारखांच्या घोषणा होऊ शकतात.
काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आज आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.