ताज्या बातम्या

Sanjay Raut : प्रधानमंत्री मुंबईत येऊन 25 - 30 सभा घेतात, मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना

Published by : Siddhi Naringrekar

महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज होणार आहे. राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येणार असून ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, प्रधानमंत्री मुंबईत येऊन महाराष्ट्रात येऊन 25 - 30 सभा घेतात. मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना. लोकांना मुर्ख बनवण्यासाठी तुम्ही आता सभा घेतायत. आपण तर विकास केला असता, आपण महाराष्ट्रासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या असत्या. तर अशाप्रकारे ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही असं सांगितले. त्यांना मांडीवर घेऊन बसावं नसते लागले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, जे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत ते स्वत:ला महाराष्ट्राचे स्वाभिमानी म्हणतायत. त्यासाठी आपला पक्ष स्थापन केला म्हणत आहेत. ते महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसतात आणि त्यांच्यावरती आज कौतुकांची फुलं उधळणार. हे चित्र महाराष्ट्राला एकदा याची देही याची डोळा पाहू द्या. म्हणून म्हटलं या निवडणुकीनंतर काही सुपारीची दुकानं बंद होणार. ती कायमची बंद होतील. असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

Rajan Teli : भाजप नेते राजन तेली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार

Ravi Rana : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आमदार रवी राणा यांचा प्रचार सुरू