कार्तिकी महापूजेच्या वादावरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकार जर पूजा करू शकत नसेल तर हे चुकीचं आहे. सरकारने विरोध करणाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे, असे खासदार संजय राऊत म्हणत आहे. यासोबतच तुम्ही अखंड महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठ्ठलाला पूजेशिवाय कसे काय ठेवू शकता, असा सवाल देखील संजय राऊतांनी सरकारला केला आहे.