पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या दिंडोरीमध्ये प्रचार सभा पार पडली. या सभेच्यावेळी पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु असताना एका तरुणाने कांद्यावर बोला अशी घोषणाबाजी केली. त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सभास्थळावरुन बाहेर नेलं. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, मा. मोदीजी शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या मालाला भाव देण्याची मागणी शेतकरी कळवळून करतोय... पण ही जन की_बात ऐकण्याऐवजी पोलिसांच्या मदतीने त्या शेतकऱ्याचा आवाज तुम्ही दाबून टाकला आणि आपली #मन_की_बात रेटली..
पण ४ जून रोजी तुम्हाला जन की_बात चा आवाज इतक्या मोठ्या प्रमाणात ऐकू येईल की, त्या आवाजाने कानठळी बसल्याशिवाय राहणार नाही. असे रोहित पवार म्हणाले.