ताज्या बातम्या

Rohit Pawar : ज्या ज्या गोष्टी लोकशाहीमध्ये बसत नाही त्या सगळ्या गोष्टी त्यांनी करुन दाखवल्या, तरीसुद्धा लोकांनी लोकशाहीला निवडलं

राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून दुसरा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून दुसरा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेतकरी प्रश्नांसह विविध मुद्द्यांवरुन शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं घरं, कुटुंब फोडली, पैशाचा वापर केला, गुंडांचा वापर केला, दडपशाहीचा वापर केला. अनेक लोकांना भिती दाखवली. ज्या ज्या गोष्टी लोकशाहीमध्ये बसत नाही त्या सगळ्या गोष्टी त्यांनी करुन दाखवल्या. तरीसुद्धा लोकांनी लोकशाहीला निवडलं. ही सगळ्यात महत्वाची आणि चांगली गोष्ट आहे.

यासोबतच ते म्हणाले की, या बजेटमध्ये आपण जर बघितलं. कुठेतरी भाजप आणि भाजपाचे मित्रपक्ष घाबरलेत हे आपल्याला बघावं लागेल आणि ते दिसतंय. कारण की, अजितदादा बोलत असताना दहाव्यांदा ते बजेट सादर करत होते आणि गेल्या दहावेळेस त्यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये जो प्रमुख विषय होता शेतीच्या पाण्याचा तो त्यांनी वगळला होता. पहिल्यांदा त्यांनी तो घेतला. लोकांना बऱ्याच योजना पोहचल्यात नाहीच. लोकांना माहित नाही आहे सरकारने आपल्या हितासाठी काय केलं. त्यामुळे आता यांना पोस्टर लावण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहिला नाही. लोक यांना नाकारतील आणि महाविकास आघाडीला बहुमत देतील. असे रोहित पवार म्हणाले.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश