Rahul Gandhi Resigns From Waynad Loksabha : वायनाड आणि रायबरेली या मतदार संघातून राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. दोन्ही मतदारसंघात विजयी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाडमधून राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता वायनाड मतदारसंघातून प्रियांका गांधी पोटनिवडणूक लढवणार आहेत.
काय म्हणाले राहुल गांधी?
वायनाडशी माझं भावनिक नातं आहे. मागील पाच वर्ष मी वायनाडचा खासदार होतो. वायनाडच्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी प्रेम दिलं. त्यासाठी मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. प्रियांका वायनाडमधून निवडणूक लढवणार आहे. पण वायनाडला अधूनमधून भेट देत राहिल. वायनाडला जी आश्वासने दिली आहे, ती आम्ही पूर्ण करणार.
काय म्हणाल्या प्रियांका गांधी?
वायनाडचं प्रतिनिधीत्व करण्याची मला संधी मिळाल्याबद्दल मला आनंद झाला. मी येथे राहुल गांधींची कमी भासू देणार नाही. सर्वांना आनंदित ठेवण्यासाठी मी खूप मेहनतीने काम करेन. रायबरेलीशी माझं जुनं नातं आहे. अमेठी आणि रायबरेलीत मी २० वर्षांपासून काम केलं आहे. ते नातं तुटू शकत नाही, ते नातं टीकवण्यासाठी आम्ही दोघे आहोत.
रायबरेलीत आम्ही दोघंही उपलब्ध असू. मी भाऊला मदत करेन. वायनाडमध्येही आम्ही सोबत असू.