मुंबईत धोकादायक इमारतींवर फलक लावण्यास बंदी करण्यात आली आहे. जाहिरात फलक पडून दुर्घटना होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने विशेष खबरदारी घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेने जाहिरात फलकांबाबत नियमावली जाहीर केली आहे.
जाहिरात फलक पडून दुर्घटना होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. धोरणाच्या मसुद्यात फलकांच्या मजबुतीवर विशेष भर देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच आता आता डिजिटल जाहिरातींसाठीची नियमावलीही समाविष्ट करण्यात येणार आहे.