ताज्या बातम्या

लोकसभेला अजितदादांनासोबत घेतलं म्हणून फटका बसला या चर्चेवर नार्वेकर स्पष्ट म्हणाले...

Published by : Dhanshree Shintre

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'लोकशाही संवाद 2024' या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे. दिवसभर मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दलही चर्चा होणार आहे.

लोकशाही संवाद या कार्यक्रमात राहुल नार्वेकर यांच्यासोबत मुलाखत झाली. या मुलाखतीत राहुल नार्वेकर यांना एक प्रश्न विचारण्यात आला की लोकसभेला अजितदादांनासोबत घेतलं म्हणून फटका बसला या चर्चेवर नार्वेकर म्हणाले की, कुठच्याही आघाडी किंवा कुठच्याही युतीमध्ये मतभेज असू शकतात आणि असायलाच पाहिजे.

सगळ्याच गोष्टींवर जर का आपण एकमताने निर्णय घ्यायला लागलो, तर मग आपण चुकतोय कुठे किंवा सुधार कुठे करावा हे कधी होणारच नाही आणि त्यामुळे मला वाटतं मतभेद असतात. परंतू, मतभेद जरी असले तरी शेवटी जो निर्णय पक्षश्रेष्ठी घेते, तोच निर्णय सगळ्या पक्षातील लोकांना सगळ्यांना मान्य असतं, असे राहुल नार्वेकर हे लोकशाही संवाद 2024 च्या मुलाखतीत म्हणाले.

Laapataa Ladies: किरण रावच्या 'लापता लेडीज'ची 'ऑस्कर'साठी निवड; फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केली पुष्टी

SL vs NZ: प्रभात सूर्याने रचिन रवींद्रची मेहनत घालावली वाया; श्रीलंकेचा न्यूझीलंडवर दमदार विजय

Navra Majha Navsacha 2 Movie Review: "नवरा माझा नवसाचा 2" यंदाच्या ट्रेनच्या प्रवासाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम

Netflix Squid Game 2: "स्क्विड गेम 2" चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Latur : लातूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने आज लातूर बंदची हाक