ताज्या बातम्या

Nana Patole : माझी लढाई खुर्चीची नाही, माझी लढाई महाराष्ट्राच्या विकासाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची आहे

Published by : Siddhi Naringrekar

नाना पटोले यांनी ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये नाना पटोले म्हणाले की, मी विलासराव देशमुख साहेबांचा शिष्य आहे. ते सांगायचे की, वेळेच्या आणि नशिबाच्या जास्त काही मिळत नाही. माझ्या नशिबात असेल तर जे व्हायचे ते होईल. पण मला माझा महाराष्ट्र जो आज पेटतो आहे, तो महाराष्ट्र मला शांत करायचा आहे.

महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील साहेब, विलासराव देशमुख साहेबांच्या काळातला महाराष्ट्र आहे तो पुन्हा आम्हाला उभा करायचा आहे. आज महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचे कर्ज राज्याच्या सरकारने करुन ठेवलेलं आहे. राज्यातलं सगळं गुजरातला पाठवले आहे. गुजरातचा ड्रग्ज मुंद्रा पोर्टवरुन महाराष्ट्रात आणून आमच्या नवीन पिढीला बरबाद केलं जात आहे. त्यामुळे मला चिंता ती आहे.

यासोबतच ते म्हणाले की, त्यामुळे देवाच्या चरणी मी हीच प्रार्थना करतो, जे काही मिळेलं त्याला चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेसाठी माझी लढाई राहिलेली आहे. माझी लढाई खुर्चीची नाही, माझी लढाई महाराष्ट्राच्या विकासाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची आहे आणि ती लढत राहीन. असे नाना पटोले म्हणाले.

पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

पर्यावरण रक्षण आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा जाहीर

Aditi Rao Hydari Wedding Look: नववधू अदिती राव हैदरी सजली नवराईच्या पेहरावात, पाहा "हे" सुरेख फोटो...

Narendra Patil On Jarange Patil | नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगे राजेश टोपेंवर हल्लाबोल | Marathi News

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi | गायकवाडांकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा | Marathi News