ताज्या बातम्या

राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरुच; मुंबई, ठाण्यात पुढील 3 दिवस पावसाचा अलर्ट

Published by : Siddhi Naringrekar

परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ घातला आहे. मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने शहर आणि उपनगरांत बुधवारी दमदार हजेरी लावली.

मुंबई शहर आणि उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून अनेक भागांत पाऊस पडत होता. काही ठिकाणी या पावसामुळे सखल भागात पाणी देखील साचले. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबई, ठाण्यात पुढील 3 दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पुढचे दोन-तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबई, ठाण्याला अलर्ट देण्यात आला आहे.

Rohit Pawar : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Supriya Sule : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर; सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या...

धुळ्यात मुसळधार पाऊस; शेतीचे प्रचंड नुकसान

Monkeypox : मंकीपॉक्सचा धोका वाढला; भारतात मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण आढळला

राज्यातील अंगणवाडी सेविकांकडून 1 ऑक्टोबरला राज्यभरात चक्का जाम आंदोलनाचा इशारा