विधानसभा निवडणुकांच्या तारिखा जाहीर होताच मराठा आंदोलक मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जरांगे यांनी महायुती सरकार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विखारी टीका केली आहे.
महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यामागणीसाठी मनोज जरांगे ठाम होते. तसेच विधानसभा निवडणुकीआधी मराठ्यांना आरक्षण न मिळाल्यास सरकार पाडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला दिला होता. मराठ्यांची दखल न घेता त्यांना बेदखल करण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.