विधिमंडळाचा आजचा दिवस वादळी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी मुंबईतील पाणी तुंबण्याच्या घटनांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री अजित पवार आज पुरवणी मागण्या सादर करणार असल्याची माहिती मिळत आहे.
तब्बल 95 हजार पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार आहे. पुरवणी मागण्यांसाठी 40 हजार कोटींची तरतूद असल्याची माहिती आहे.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात ९५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार असून या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.