राजकारण

मोठी बातमी ! राहुल गांधी रायबरेलीतून 4 लाख मतांनी विजयी, अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणींचा पराभव

Published by : Dhanshree Shintre

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेची सात टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. इंडिया आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय संघर्ष राज्यासह देशभरात पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभेचा आजचा निकाल पाहण्याची देशभरातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली मतदारसंघातून ४ लाख मतांनी विजयी झाले आहेत. संपूर्ण देशभरात भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून भाजप सरकारला धारेवर धरणाऱ्या राहुल गांधींना जनतेनं कौल दिला आहे. तसच या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या नेतृत्वात उतरलेल्या इंडिया आघाडीनं भाजपच्या महायुतीला काँटे की टक्कर दिली आहे.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा