सतेज औंधकर, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 17 फूट 10 इंचावर पोहचली आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड तर कासारी नदीवरील येवलुज असे सहा बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती मिळत आहे.
7 बंधारे पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून मुसळधार पावसाने राधानगरी, पाटगाव, घटप्रभा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे.
यासोबतच मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 30.42% भरलं असून धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू असल्याची माहिती आहे.