MNS Team Lokshahi
ताज्या बातम्या

विनापरवाना बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा अन्यथा उग्र आंदोलन करू - मनविसेचा आरटीओला इशारा

Published by : Sagar Pradhan

अमजद खान: काही दिवसांपूर्वी अंबरनाथ मध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा एका बस अपघात झाला होता सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवित हानी झाली नाही मात्र या घटनेच्या निमित्ताने विनापरवाना बेकादेशीरपणे विद्यार्थ्यांचे वाहतूक करणाऱ्या वाहनांचा प्रश्न ऐरणीवर वर आला होता. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक पवित्रा घेतला.

आज मनविसेच्या शिष्टमंडळाने कल्याण आरटीओ ची भेट कल्याण परिवहन क्षेत्रातील सर्वच खाजगी तसेच शालेय विद्यार्थ्यांचे नियोजन करणाऱ्या वाहनांची तपासणी करावी विनापरवाना बेकादेशीरपणे विद्यार्थ्यांचे वाहतूक करून त्यांच्या जीवित असे खेळणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आरटीओकडे केली तसेच इतर पंधरा दिवसात जर कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करून असा इशारा देखील मनविसेतर्फे देण्यात आला. तर याबाबत कल्याण आरटीओ कडून कारवाई सुरू असून एप्रिल पासून आजपर्यंत सुमारे १२० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई सातत्याने सुरू असल्याचे सांगितले.

I phone Launch: बहुप्रतीक्षित आयफोन-16ची विक्री सुरु; आयफोन-16 सिरीजच्या खरेदीदारांमध्ये क्रेझ

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश; मोहित कंबोज यांचं ट्विट, म्हणाले...

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र; पत्रात काय?

कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरण; 41 दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे