अमरावतीत कार्यालयावरुन भाजप- काँग्रेस संघर्ष वाढलेला पाहायला मिळत आहे. यशोमती ठाकूर यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात असलेल्या खासदार जनसंपर्क कार्यालयावरून अमरावतीत भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद झाला होता.
जनसंपर्क कार्यालय देण्यास टाळाटाळ करीत असल्याचां आरोप करत यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे यांनी टाळे तोडून जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेतला.
याच पार्श्वभूमीवर आता खासदार जनसंपर्क कार्यालयाचा टाळे तोडून ताबा घेणाऱ्या नवनिर्वाचित काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासह दहा जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.