महाराष्ट्र

ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी बंद

Published by : Shweta Shigvan-Kavankar

ठाणे : ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी बंद राहणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 12 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे नागरीकांना आवाहन केले आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात उथळसर प्रभाग समिती अंतर्गत जलकुंभाची इनलेट जलवाहिनी ही के-व्हीला नाला येथील पुल प्रकल्पाच्या कामात 500 मिमी व्यासाची इनलेट जलवाहिनी बाधित होत असल्याने सदर बाधित जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम सुरु आहे.

याच कारणामुळे ठाणे शहरात शनिवार 6 मे रोजी सदर जलवाहिनीचे क्रॉस कनेक्शन करण्याचे काम हाती घेतल्याने सकाळी 9 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 12 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत उथळसर प्रभाग समिती मधील जलकुंभ अंतर्गत श्रीरंग सोसायटी परिसर, राबोडी 1, राबोडी 2, पंचगंगा, आकाशगंगा, के-व्हीला परिसर, पोलीस लाईन, टेंभीनाका, सिव्हील हॉस्पिटल, ठाणे जेल, आरटीओ परिसर, कॅसल मिल, धोबी आळी व उथळसर परिसर इ. भागांचा पाणी पुरवठा 12 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे नागरीकांना आवाहन केले आहे.

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...