महाराष्ट्र

अमरावतीच्या जामडोल येथे वीज पडून दोघांचा मृत्यू; चौघे बचावले

Published by : Shweta Chavan-Zagade

अमरावती/ सुरज दाहाट : अमरावती तालुक्यातील माहूली जहागीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जामडोल शेतशिवारात आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक मेघ गर्जनेसह पाऊस पडला. यात शेतात काम करत असलेल्या ६ जणांच्या अंगावर वीज पडली. यात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर यात चार जण सुखरूप बचावले.

किशोर भगवान पाटील वय४२ व अविनाश श्यामराव निबोंरकर वय ३२रा.दोघेही करजगाव ता.अमरावती असे मृतकाचे नाव असून प्राप्त माहितीनुसार शेतात फवारणी करण्यासाठी गेले असता सदर प्रकार घडला,मृतक शेतकरी किशोर पाटील हे जामडोल येथे बऱ्याच वर्षा पासून शेती मक्ताने वाहीत होते, नेहमी प्रमाणे ते आपल्या शेतात मजूर घेऊन गेले होते,पाऊस आल्याने झाडाच्या आडोशाला सर्व सहाही जण थांबले असता त्यांच्या अंगावर वीज कोसळली यात ही घटना घडली, तर यात एक जण किरकोळ जखमी सुध्दा झाला, घटनास्थळी माहूली जहागीर पोलीस व महसूल कर्मचारी दाखल झाले होते त्यांनी पंचनामा केला.

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू