महाराष्ट्र

साठवण तलाव फुटण्याची शक्यता; तीन गावांना धोका

Published by : Lokshahi News

बालाजी सुरवसे | उस्मानाबाद जिल्ह्यातील हातोला येथील साठवण तलावाला लागलेल्या गळतीमुळे हा तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाशी तालुक्यातील या तलावाखालील हातोला, रुई, जेबा या गावांना धोका असल्यामुळे गावकऱ्यामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी थेट साठवण तलावावरूनच आमरण उपोषण सुरू केले आहे.

गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. लाखो लिटर पाणी वाया जात आहे. महत्वाची बाब म्हणजे हे साठवण तलाव कधीही फुटू शकत. आणि या तलावाचा तीन गावांना धोका आहे. तलाव फुटल्यावर तीन गाव वाहून जावू शकता. हा लढा २०१२ पासून येथील शेतकरी आणि ग्रामस्थ करत आहेत. दरम्यान तत्कालीन उप जिल्हाधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले होते, या संबंधित अधिकार्यावर ४५ दिवसांत कारवाई करू. आणि या तलावाची दुरुस्ठी लवकरात लवकर करू. परंतु यांच्यावर अद्याप काही कारवाही झालेली नाही. हे गावकऱ्यांचे उपोषण आरपारची लढाई आहे. हा तलाव तत्काळ दुरुस्थ करण्यात यावा अशी शेतकरी, ग्रामस्थ यांची मागणी आहे.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने