महाराष्ट्र

पिकाचे पैसे न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार बोंबा बोंब आंदोलन

Published by : Lokshahi News

सुरेश वायभट/पैठण , प्रतिनिधी

पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना संचलित सचिन घायाळ शुगर इंडस्ट्रीज शेतकऱ्यांना पिकाचे पैसे अद्याप न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. गळीत हंगाम बंद होवुन तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील शेवटचे 2 महिन्यांची शेतकऱ्यांची ऊसाची पैसे अद्याप पर्यंत न दिल्यामुळे 4 सप्टेंबरला सचिन घायाळ शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन यांचे निवासस्थाना समोर बोंबा बोंब ' आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिला आहे.

पुढील हंगाम सुध्दा 02 ते 03 महिन्यावर येऊन ठेपलेला असल्याने आपण मागील ऊसाची थकीत बिले अदा केलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये आपल्या कारखान्यास ऊस देण्या बाबत संभ्रम निर्माण झाला असल्याचे माऊली मुळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज कोकणात

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून आज बीडसह, धाराशिव बंदची हाक

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस; प्रकृती खालावली

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ