महाराष्ट्र

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी बोलावलेल्या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांसमोरच जोरदार वादवादी

Published by : Lokshahi News

पूरग्रस्तांच्या पुनर्वसन संदर्भात बोलवलेल्या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांसमोरच वादवादीचा प्रकार कोल्हापुरात घडलायं. शेतकरी संघटनेच्या माणिक शिंदे आणि ग्रामस्थांमध्ये हा वाद झाला.

शिये गावचे पुनर्वसन करावे, याबाबत माणिक शिंदे यांनी नदीत उडी घेत आंदोलन केले होते. त्यानंतर आज याबाबत प्रांत अधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. मात्र माणिक शिंदे आणि इतर गावकऱ्यांच्यात यावेळी वाद झाला.

शिंदे हे वकिलीच्या व्यवसायाच्या माध्यमातून गावावर दबाव टाकण्याचे काम करत असल्याचा आरोप करत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार यावेळी पाहायला मिळाला.

Navra Maza Navsacha 2 : "नवरा माझा नवसाचा २"ला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद

Snake in the train: Garib Rath Express मध्ये चक्क साप | Marathi News

MIM MP Imtiaz Jaleel Organises Tiranga Rally: MIMची संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज अहमदनगर बंदची हाक

Ashok Saraf: महाराष्ट्राचे लाडके अशोक मामा लवकरच येणार टेलिव्हिजनवर; “या” मालिकेद्वारे येणार प्रेक्षकांच्या भेटीला