महाराष्ट्र

अमरावतीत आता शांतता तर दंगल करणाऱ्यांना सोडणार नाही -पालकमंत्री यशोमती ठाकूर

Published by : Lokshahi News

त्रिपुरा हिंसाचाराचे अमरावतीत देखील हिंसक पडसाद उमटले होते. तर यात अमरावती बंद दरम्यान भाजपाच्या वतीने तोडफोड आणि जाळपोळ तसेच पोलिसांना मारहाण केल्याने अमरावतीत आज सकाळ पासून भाजप नेत्यांना अटक करण्याचे सत्र सुरू आहे.

अमरावतीमध्ये सर्वत्र शांतता असून काल व आज कुठल्याही प्रकारे गालबोट लागलं नाही, अशी माहिती अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. तर अमरावतीत संचारबंदी असल्याने नागरिकांना मूलभूत सुविधासाठी 2 ते 4 या वेळेला परवानगी देण्यात आली आहे. तसेच लवकरात लवकर परिस्थिती नार्मल होईल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. तर अमरावती शहरातील 4 ते 5 हजार पोलीस वगळता राज्य राखीव दल पोलीस बंदोबस्तसाठी तैनात असल्याचे देखील त्यांनी सांगितले तर, दंगल करणाऱ्यांना कोणालाही सोडणार अशी माहिती सुद्धा यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत दिली आहे.

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल