महाराष्ट्र

कामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांना पालिकेने ब्लॅकलिस्ट करावे – पृथ्वीराज चव्हाण

Published by : Lokshahi News

अरविंद जाधव, कराड | बुधवार पेठेतील विराट चव्हाण या लहान मुलाचा शाळेच्या बांधकाम खड्ड्यात पडून मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या घरी भेट दिली.

विराट चव्हाणचा मृत्यू झाला त्यावेळी आ. चव्हाण बाहेरगावी होते. काल शहरात येताच त्यांनी बुधवार पेठ येथील विराट चव्हाण याच्या घरी भेट देऊन त्याच्या कुटुंबियांची विचारपूस करीत सांत्वन केले. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे उपस्थित नागरिकांनी आ.चव्हाण यांच्या निदर्शनास आणले. तसेच पालिकेच्या हलगर्जीपणामुळे गेल्या 2 वर्षात अशा 11 घटना घडल्या असल्याच्या तक्रारी आ.चव्हाण यांना उपस्थित नागरिकांनी केल्या. यावर आ.चव्हाण यांनी चिंता व्यक्त करीत मुख्याधिकारींना या गंभीर विषयाबाबत फोन करून जे ठेकेदार त्यांच्या कामात हलगर्जी करतात अशांना ब्लॅकलिस्ट करावे अशा सूचना दिल्या. नागरिकांच्या तक्रारीबाबत पालिकेने सतर्क असण्याची गरजही यावेळी आ. चव्हाण यांनी व्यक्त केली. यावेळी कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.

अजित पवार नवाब मलिक यांच्या भेटीला, भेटीमागचं मोठं कारण समोर

आम्हाला सत्तेत बसवा, मराठा आरक्षणावर तोडगा काढून दाखवतो : संभाजीराजे

भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून गोपीचंद पडळकर मैदानात

Foot Massage: पदभ्यंग म्हणजेच पायाच्या मसाजचे अनेक फायदे

Crossfire with Sambhaji Raje: परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रात परिवर्तन घडणार?