महाराष्ट्र

मुंबई ते नागपुर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विचार सुरू;केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

Published by : Lokshahi News

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात महत्वाचं विधान केल आहे.मुंबई-अहमदाबाद आणि दिल्ली-वाराणसी या बुलेट ट्रेन प्रकल्पाप्रमाणेच मुंबई ते नागपुर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा विचार आहे.

रेल्वे राज्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर दानवे यांनी पहिल्यांदाच मतदार संघाचा दौरा केला.औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली होती. दानवेंनी याच पत्रकार परिषदेत बुलेट ट्रेन संदर्भात महत्वाचं विधान केलं

मुंबई-औरंगाबाद प्रवास फक्त दिड तासात

याच दरम्यान हा प्रकल्प पार पडला तर मुंबई- औरंगाबाद अंतर फक्त दिड तासात गाठता येणार आहे.तर फक्त तीन ते साडेतीन तासात मुंबईहुन नागपुरला पोहचता येणार आहे.त्यासाठीच या प्रकल्पासाठी गांर्भीर्याने विचार सुरू आहे. असे दानवे म्हणाले.

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...