राजकारण

Pune Guardian Minister: ...म्हणजे लोक मरू दे, यांना राजकारण महत्वाचे; वडेट्टीवारांचे सरकारवर टीकास्त्र

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे. अशातच, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजप चाणक्यला आमदार पुरवायला, गोळा करायला फोडायला वेळ मिळतो. पण इथे शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्रणा आणि भरती करायला वेळ नाही, असा टोला विजय वडेट्टीवारांनी सरकारला लगावला आहे.

एक उपमुख्यमंत्री आजारी म्हणून घरी बसतात. पालकमंत्री पदासाठी निवडलेला जिल्हा भेटत नाही म्हणून रुसून बसतात. मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री दिल्लीला जातात. म्हणजे लोक मरू दे, यांना राजकारण महत्वाचे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. यापाठोपाठ नागपूरमध्येही नांदेडची पुनरावृत्ती घडली आहे. नागपूरच्या शासकीय मेयो आणि मेडिकल हॉस्पीटलमध्ये मागील 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यूने राज्याचे लक्ष वेधले आहे.

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल