मुंबई महापालिका निवडणुकीवरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात. याच पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, मुस्लिम मतदारसंघात महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत बदल झाला पाहिजे. आम्ही महापालिकेत 88 जागा लढवणार आहोत.
तसेच आम्ही मुंबई महापालिकेत 88 जागा लढवणार आहोत. आम्हाला जर महापालिकेत मुस्लिमांनी मदत केली तर बदल घडून येईल. त्यामुळे बदलाचं राजकारण सुरू होणार आहे. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. खूप वर्षापासून मी मुस्लिमांचं राजकारण पाहत आलो आहे. मुस्लिमांच्या राजकारणात गढे मुर्दे उखडले जात आहेत. यांना दंगली हव्या आहेत काय? असे प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमात बोलत होते.