राजकारण

पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर टीका! उध्दव ठाकरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, 70 हजार कोटी...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

रायगड : शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी शिर्डीतील सभेतून केला होता. या टीकेला आता उध्दव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काल मोदी यांनी 70 हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण स्टेजवर कोणीतरी बसलं होते, असे म्हणत उध्दव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. रायगड येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

उध्दव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी 70 हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण स्टेजवर कोणीतरी बसलं होतं. ते म्हणाले की शरद पवार यांनी शेतीसाठी काही केलं नाही. परंतु, 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शरद पवारांनीच केली होती. किती सुडाचं राजकारण कराल, असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना केला आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

महाराष्ट्रातील बडे नेते केंद्रात बराच काळ कृषीमंत्री होते, वैयक्तिकरित्या सन्मान करतो. मात्र, माजी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, असा सवाल विचारत पंतप्रधान मोदी यांनी अजित पवारांसमोरच शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?