राजकारण

मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांचे सुरतच्या दिशेने स्थलांतर; उद्योगमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

यवतमाळ : मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला इथला व्यवसाय बंद करून सूरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतून हा व्यवसाय गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आता सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. याला आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एक दुसरा व्यापारी या जिल्ह्यातल्या त्या जिल्ह्यात या राज्यात त्या राज्यामध्ये गेला त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने इंडस्ट्री तिकडे गेली अशा पद्धतीची चर्चा होते. महाराष्ट्राच्या डायमंड क्षेत्रासाठी अतिशय मोठा निर्णय हा शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतलेला आहे. मुंबईपासून जवळच नवी मुंबई येथे डायमंड हब करण्याचा निर्णय घेतला आहे आणि डायमंड पॉलिसी देखील आम्ही केलेली आहे. मी आवर्जून आपल्याला सांगतो की एक वर्षानंतर देशातला सगळ्यात मोठा डायमंड हब हा महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईला असेल आणि तो सगळ्यात मोठा असेल, असे उदय सामंतांनी म्हंटले आहे.

मराठा आरक्षणाप्रश्नी ते म्हणाले की, मुख्यमंत्री आरक्षणाचा प्रश्न सोडवणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण टिकणार दिलं पाहिजे ही सरकारची भूमिका अनेक वेळा शिंदेंनी सांगितलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीर केल्यानंतर परत कोणी बोलावं अशी अपेक्षा करणे योग्य नाही.

पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

पर्यावरण रक्षण आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा जाहीर

Aditi Rao Hydari Wedding Look: नववधू अदिती राव हैदरी सजली नवराईच्या पेहरावात, पाहा "हे" सुरेख फोटो...

Narendra Patil On Jarange Patil | नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगे राजेश टोपेंवर हल्लाबोल | Marathi News

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi | गायकवाडांकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा | Marathi News