Sanjay gaikwad | Girish Mahajan  Team Lokshahi
राजकारण

भाजपमुळे नाही तर 'या' कारणामुळे शिवसेनेत बंडखोरी, गायकवाडांनी खोडले महाजनांचे वक्तव्य

Published by : Sagar Pradhan

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यात अद्यापही राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच ही बंडखोरी का झाली कशी झाले? याबाबत आजही वेगवेगळे विधान येत आहे. अशातच या बंडखोरीबाबत भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी मोठे वक्तव्य केले होते. त्यावरच शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देत हे विधान चुकीचे असलेले सांगितले आहे.

नेमकं काय म्हणाले संजय गायकवाड?

गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, गिरीश महाजन यांनी केलेले हे विधान चुकीचे आहे. आम्ही भाजपमुळे शिवसेनेतून बाहेर पडलो नाही. तर उद्धव ठाकरे घराच्या बाहेर येत नव्हते. आमची कुठलीच कामं होत नव्हती. आम्हाला वर्षावर, मातोश्रीवर एन्ट्री नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो. असे संजय गायकवाड यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे आम्हाला आपल्याच घरात साप पाळल्यासारखे वाटत होते. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो, याचे गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही, असा टोला देखील आमदार गायकवाड यांनी गिरीश महाजन यांना लगावला.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने