राजकारण

आमचे शासन किमान घरी बसले नाही हाच फरक; शंभूराज देसाईंचा उध्दव ठाकरेंवर पलटवार

उध्दव ठाकरेंची हिंगोलीत जाहिर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले होते. या टीकेला आता शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सोलापूर : उध्दव ठाकरेंची हिंगोलीत जाहिर सभा झाली. या सभेत 'शासन आपल्या दारी, थापा मारतो लय भारी', अशा खोचक शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले होते. या टीकेला आता शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिले आहे. आमचे शासन किमान घरी बसले नाही हाच मुख्य फरक आहे, असा टोला शंभूराज देसाईंनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

आमचे शासन किमान घरी बसले नाही हाच मुख्य फरक आहे. आमचे शासन थापा मारत नाही तर राज्यातील दीड कोटी जनतेला घरपोच लाभ दिले आहेत. ज्यांनी आमच्या सरकारवर टीका केली ते घरात बसले होते आणि या सरकारचे मुख्यमंत्री लोकांच्या दारात जात आहेत, असे पलटवार शंभूराज देसाईंनी उध्दव ठाकरेंवर केला आहे.

कॅबिनेटच्या बैठकीत दुष्काळासंदर्भात चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जलसाठ्यातील पाणी पिण्यासाठी संरक्षित करण्याचे आदेश दिलेत. तसेच पिकासाठी जिथे गरजेचे आहे तिथे पाणी सोडण्याचे देखील आदेश दिले आहेत. दुष्काळाबाबत सरकार संवेदनशील आहे. जिथे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे तिथे डीपीतून चाऱ्यासाठी निधी देण्याचे आदेश दिलेत. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकार सर्वतोपरी तयार आहे, असेही देसाईंनी म्हंटले आहे.

शिवसेनेची पहिली यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल