पंढरपूर : राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा सध्याचा काँगेस प्रदेशाध्यक्ष, अशी जहरी टीका शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केली आहे. सांगोल्याचे राष्ट्रवादीचे नेते बाबुराव गायकवाड यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाला शहाजी बापू पाटील यांनी हजेरी लावली होती. यावेळी ते बोलत होते.
नाना पटोले म्हणजे ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय. राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा सध्याचा काँगेस प्रदेशाध्यक्ष आहे. काँगेसकडे पद द्यायला माणूस नाही म्हणून नाना पटोलेंना पद दिलंय, असा टोला शहाजी बापू पाटलांनी पटोलेंना लगावला आहे. तर, सत्तासंघर्षाचा 12 तारखेला निकाल आमच्या बाजूने लागणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.