संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. बेलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संदीप नाईक म्हणाले की, वैफल्यग्रस्त झालेल्या नेत्यांचे खरोखर मला वाईट वाटते. देव त्यांना सुबुद्धी देवो, देव त्यांचे भलं करो. आपण काय केलं ते सांगण्यापेक्षा काहीतरी चुकीचं आरोप, बिनबुडाचे आरोप करण्याचे काम काही घटक करत असतात. त्यामध्ये संदिप नाईक यांच्या नावाने तर आपण एखादं भाष्य केलं तर आपल्याला प्रसिद्धी मिळेल.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, सर्व माध्यमातून आपलं राजकीय हित साधलं जाईल. अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न हा काही घटक करत असतात. परंतु नवी मुंबईची जनता हे सगळं जाणते आणि नवी मुंबईची जनता त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. असे संदीप नाईक म्हणाले.