Ramdas Athwale Team Lokshahi
राजकारण

Ramdas Athwale : शिवसेनेने दिला आहे आपल्याला धोका, म्हणून...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जुई जाधव | मुंबई : शिवसेनेने दिला आहे आपल्याला धोका म्हणून आगामी निवडणुकीत शिवसेनेला रोखा, असे काव्यमय आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी केले. पवई येथे ईशान्य मुंबई जिल्हा रिपाइंच्या कार्यकर्ता मेळाव्यात रामदास आठवले बोलत होते.

रामदास आठवले यांनी शिवसेनेवर काव्यमय टीका केली आहे. ते म्हणाले की, शिवसेनेने दिला आहे आपल्याला धोका म्हणून आगामी निवडणुकीत शिवसेनेला रोखा, असे म्हणत मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आपले एकही मत वाया घालवू नका, असे आवाहन आठवलेंनी केले आहे.

महाविकास आघाडी सरकार हे दलितविरोधी आहे. अनुसूचित जाती जमातीचे पदोन्नतीमधील आरक्षण, नोकरी मधील मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढला जात नाही. मागासवर्गीयांबाबत महाविकास आघाडी सरकार निर्णय घेत नाही, असा आरोप आठवले यांनी केला आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदावर 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. अशा पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा देऊन नव्यांना संधी द्यावी आणि पक्षात वरिष्ठ पदावर काम करावे. मी कुणालाही पदावरून काढत नाही. पण, एकाच पदावर दीर्घकाळ राहिलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष हिताचा विचार करून पक्ष संघटनेचे काम करावे, असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले.

परिवर्तन महाशक्ती आघाडीवर संजय राऊत यांची टीका; बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

बीड बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क; 55 विशेष पोलीस अधिकारी तैनात

साळीच्या लाह्या खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

जालन्यात मराठा - ओबीसी समाजाचं उपोषण; उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी समाजातील लोकांची गर्दी

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीकडून गुन्ह्याची कबुली