Rahul Gandhi | Aurangabad Team Lokshahi
राजकारण

भारत जोडो यात्रेचा आज शेवटचा दिवस; मात्र, राहुल गांधी असणार उद्या औरंगाबाद दौऱ्यावर

Published by : Sagar Pradhan

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे. अशातच आजचा दिवस या यात्रेचा शेवटचा दिवस आहे. मात्र, शेवटचा दिवस असला तरी काँग्रेस नेते राहुल गांधी हे उद्या महाराष्ट्रात असणार आहेत. त्यांचे थांबण्याचे कारण म्हणजे उद्या ते औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. 'राहुल गांधी उद्या औरंगाबाद येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुकुंदवाडी बसस्टॉप जवळ काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सायंकाळी 05:30 वाजता उपस्थित राहावे', असे आवाहन औरंगाबाद काँग्रेसच्या करण्यात आले आहे.

असा असणार राहुल गांधी यांचा उद्याच्या औरंगाबाद दौरा

राहुल गांधी हे हेलिकॅप्टरने उद्या औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते औरंगाबाद विमानतळावरून गुजरात येथील सभेला जाणार आहे. गुजरात मधील सभा झाल्यानंतर ते पुन्हा औरंगाबादला परतणार आहे. पुढे औरंगाबाद विमानतळावरून ते खाजगी वाहनाने कमळनुरीला जाणार आहेत. यावेळी रस्त्यात औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी बस स्थानक येथे संध्याकाळी साडेपाच वाजता काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहे. याबाबत औरंगाबाद काँग्रेसकडून माहिती देण्यात आली आहे.

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू