राजकारण

प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर...; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमरावती : ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीने हातमिळवणी केली असली तरी अद्यापही इंडिया आघाडीमध्ये स्थान मिळाले नाही. इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. मात्र, वंचितचा इंडिया आघाडीत समावेश होण्याचा मुद्दा रेंगाळला आहे. अशातच, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, इंडिया आघाडी 28 पक्षाची आघाडी आहे. प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांना वैयक्तिक ओळखतात. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटलं पाहिजे किंवा त्यांना एक पत्र लिहिलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी आंबेडकरांनी दिला आहे.

पण, प्रकाश आंबेडकर कोणाच्या निमंत्रणाची वाट बघत आहे हे मला माहित नाही मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटायला प्रकाश आंबेडकरांना काय अडचण आहे, असाही सवाल चव्हाणांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर हे देशातील दलितांचे एक मोठे नेते आहे. त्यांच्याकडे आंबेडकरी नाव आहे. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झालं पाहिजे, त्यांनी संसदेत आलं पाहिजे. अवास्तव मागणी केली तर फायदा मोदींना होतो. 2019 मध्ये वंचितच्या उमेदवारीमुळे नऊ ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे खासदार पराभूत झाले. त्यांनी फोन करून सांगितलं पाहिजे की मला इंडिया आघाडीत येयचं आहे, असेही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हंटले आहे.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?