जी-20 डिनरसंदर्भात राष्ट्रपतींनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रावर 'President Of India' ऐवजी 'President Of Bharat' लिहल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. 9 सप्टेंबरला राष्ट्रपती भवनात G20 डिनरचं आयोजन करण्यात आले आहे. या निमंत्रण पत्रिकेत प्रेसिडेंट ऑफ भारत लिहिल्यानं काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. जयराम रमेश यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भारत जो इंडिया आहे, जो अनेक राज्यांचा समूह म्हणून ओळखला जातो. परंतु आता या राज्यांच्या समुहावर हल्ला होत आहे. असे त्यांनी म्हटले आहे.