सूरज दहाट, अमरावती
ग्रामीण, कृषी,आदिवासी क्षेत्रामध्ये खऱ्या समस्या आहे, त्यांचं दरडोई उत्पन्न कमी आहे, त्याचा जीडीपी ग्रोथ मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा फक्त 12 टक्के आहे. त्यामुळे जोपर्यंत कृषी क्षेत्राचा जीडीपी मध्ये वाटा हा 20% होत नाही तोपर्यंत गाव समृद्ध संपन्न होनार नाही. तोपर्यंत भारत आत्मनिर्भर भारत बनू शकत नाही.
दिल्ली, मुंबई चेन्नई चा कितीही विकास केला तर त्यांचा वाढता विकासदर व ग्रामीण भागाचा मागे पडलेला विकासदर त्यांचे कॉम्बिनेशन करून पुन्हा मागे जातो असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.