चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. या निकालावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे.
याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, सर्वप्रथम आम्ही जनमताच्या कौलचा आदर करतो. या निवडणुकीत दक्षिण भारतात भाजपची दारे बंद झाली आहेत. उत्तर भारतात भाजपा ध्रुवीकरण यांचे राजकारण करत आहे.
उद्या काही दिवसांत ही जनता काँग्रेसला सत्तेत आणेल .लोकसभेत लोक नरेंद्र मोदी यांचा पराभव करतील. असे नाना पटोले म्हणाले. आम्ही दक्षिणेत भाजपाला पूर्ण लॉक केले आहे. आम्हाला EVM बद्दल काय बोलायचे नाही. असे नाना ुपटोले म्हणाले.